वैचारिक लेखन 'चला खेड्यांकडे' | Vaicarika lekhana 'chala khedyankade Marathi Nibhanda


Vaicarika lekhana 'chala  khedyankade'

"MARATHI NIBHANDA"


विषय, चित्र व मुद्दे यांवर आधारित "वैचारिक लेखन चला खेड्याकडे" आज मी तुम्हाला इथे देणार आहेे .


वैचारिक लेखन 'चला खेड्यांकडे' |Vaicarika lekhana 'chala  khedyankade'
वैचारिक लेखन 'चला खेड्यांकडे' |Vaicarika lekhana 'chala  khedyankade'

शिक्षणाद्वारे समाज         खेड्यांच्या समस्या

                  ओस पडलेली खेडी 


     ' वैचारिक लेखन चला  खेड्यांकडे '


                ' खेड्यांकडे चला '


दहावी - बारावीला महाराष्ट्रभरातून झळाळते यश मिळवणाऱ्या मुलांच्या मुलाखती ऐकल्या / पाहिल्या की त्यातून आपल्या संपूर्ण समाजाचीच मानसिकता दिसून येते . या यशस्वितांपैकी एकही जण ‘ मला शेतकरी व्हायचंय ' , असे म्हणत नाही , कर्तबगार , बुद्धिमान लोकांना खेड्यांकडे पाहण्याची इच्छा नसते . वास्तविक शेती व उदयोगधंदे समानतेने वाढले नाहीत . तर देशाची संपूर्ण अर्थव्यवस्थाच कोसळून पडेल . आता हेच बघा ना , सगळे शहराकडे धावताहेत . पण शहरात आलेल्या सगळ्यांना रोजगार मिळणार कुठून ? त्यासाठी विविध उद्योग निर्माण व्हावे लागतील . पण असे उदयोग निर्माण करणार कोण ? लोक बेकार आहेत . त्यांच्या हातात पैसा नाही . मग उदयोगातून निर्माण होणाऱ्या वस्तूंची खरेदी कोण करणार ? तेच शेतीच्या बाबतीत आहे . सगळेच शहराकडे पळाले , शेती ओस पडत गेली ; तर मग देशातल्या सर्व माणसांची भूक भागवण्यासाठी अन्न कुठून मिळणार ? म्हणून आता तरुणांना ' खेड्यांकडे चला ' असे स्पष्ट आवाहन करण्याची गरज आहे . "Vaicarika lekhana 'chala  khedyankade"

खेड्यांकडे कुणीच लक्ष दिले नाही ; त्याचे विपरीत परिणाम आज दिसत आहेत . खेडी ओस पडली आहेत आणि शहरे मात्र वेडीवाकडी फुगत चालली आहेत . निसर्गाचा समतोल बिघडला आहे . प्रदूषणाच्या समस्या सतत ग्रासत आहेत . खेड्यांकडून शहरांकडे वळणारा हा माणसांचा लोंढा आपल्याला थोपवता येणार नाही का ? माणसे शहराकडे भाकरीसाठी , उदयोगधंदयांसाठी येतात . खेड्यांत करण्यासारखे काही उदयोग राहिले नाहीत ; म्हणून ही माणसे शहरांकडे धावतात . खेड्यांमध्ये दारिद्र्य , कुपोषण , आरोग्याचे भीषण प्रश्न यांनी थैमान घातले आहे . शिक्षणाच्या अपूऱ्या सोयी आहेत . रोजगाराच्या संधी नाहीत . शेती करण्यासाठी पाणी , खते , वीज यांसारख्या मूलभूत सुविधा नाहीत . शासन तिकडे लक्षच देत नाही . या अडचणींना तोंड देऊन शेतकरी अन्नधान्य पिकवतात . पण त्याच्या धान्याला बाजारात भावच मिळत नाही . ऐन हंगामात दलाल , सावकार धान्याचे भाव पाडतात , भाजीपाल्यांचे भाव पाडतात . दलाल , व्यापारी श्रीमंत होतात . शेतकरी कंगालच राहतो .chala  khedyankade'
_________________________________


आपल्या भारतात खेडी जास्त आणि शहरं थोडी आहेत . तरीही जो उठतो तो शहराकडे घाव घेतो . त्यामुळं खेडी दिवसेंदिवस ओस पडत चालली आहेत . वास्तविक खेडं हे भारताचं हृदय आहे . खेड्यात स्वच्छ हवा , पाणी आणि भरभरून आनंद देणारा निसर्ग आहे . ही परिस्थिती स्वातंत्र्यप्राप्तीनंतर महात्मा गांधी यांच्या लक्षात आली , तेव्हाच त्यांनी तरुणांना आवाहन केलं , ' खेड्याकडे चला . ' 

खेड्यात जन्माला आलेले तरुण शेतकी व्यवसायाचे पदवीधर होतात आणि शहरात नोकरी धंद्यानिमित्त स्थिरस्थावर होतात . शहरात साऱ्या सुखसोयी उपलब्ध असल्यामुळं त्यांना पुन्हा खेड्याकडे जायची इच्छा होत नाही . परिणामी , खेड्यातील जीवनमानात म्हणावी तशी सुधारणा होत नाही . काही अपवादात्मक खेडी आज सुधारलेली दिसतात . ज्या खेड्यांत वीजपुरवठा आहे . नळाचं पाणी आहे , दवाखाना आहे , वाहतुकीची पुरेशी साधनं आहेत अशी स्वयंपूर्ण खेडी थोडी . परंतु बहुसंख्य खेड्यात जीवनावश्यक सोयी उपलब्ध नाहीत ही वस्तुस्थिती आहे . 

खेड्यांत अनेक लोक निरक्षर आहेत याचं प्रमुख कारण म्हणजे आजही अनेक खेड्यांत शाळाच नाहीत . त्यामुळं शिक्षणाचं महत्त्व खेड्यातील जनतेला कळत नाही . शिक्षण क्षेत्रात आपलं आयुष्य वेचणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांची अशी इच्छा होती की प्रत्येक खेड्यात शाळा असलीच पाहिजे . विनाशाळेचं एकही गाव महाराष्ट्राच्या नकाशात दिसता कामा नये . इतकंच नव्हे तर , प्रत्येक नांगरामागे एक पदवीधर मनुष्य उभा राहिला पाहिजे . आजच्या पिढीत खेड्यातील तरुण पदवीधर होतीलही पण अशिक्षितांना त्याचा काय उपयोग ? खेड्यांत राहणाऱ्याला किमान लिहिता वाचता तरी आलं पाहिजे , तो साक्षर झाला पाहिजे . त्यासाठी तरुणांनी खेड्याकडं वळलं पाहिजे . वैद्यकीय शिक्षण पुरं झाल्यावर तरुण डॉक्टरनेेखेड्यात दवाखाना उघडला पाहिजे . शासकीय रुग्णालयात तालुक्याला वैद्यकीय अधिकारी म्हणून स्वेच्छेनं गेलं पाहिजे . 

आरोग्यासाठी स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे , हे खेड्यातल्या जनतेला अजून पटलेलं नाही . पिढ्यान्पिढ्या तेच गलिच्छ राहणीमान , बुरसट विचारसरणी , जुन्या समजुती , अंधश्रद्धा . यातून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न व्हायला हवा . विहिरीला पाणी लागेल की नाही हे शास्त्राच्या आधारे पाहणं महत्त्वाचं असूनही देवाने कौल दिला तरच विहिरीला पाणी लागेल किंवा आजारी मुलाचा ताप उतरत नसेल तर त्याला भूतबाधा झाली , भगताकडे नेऊनच तो बरा होईल ह्या आणि अशा घातक समजुतीतून त्यांची मुक्तता केली पाहिजे . काही वर्षांपूर्वी मराठवाड्यात घडलेलं ' मानवत ' प्रकरण किंवा ' देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी मुलीला बळी दिले ' अशा बातम्या वाचल्या की मन खिन्न होतं . 

खेड्यात राहणारे लोक मुंबईत किंवा अशाच शहरात नोकरी करणाऱ्या चाकरमान्यांच्या मनिऑर्डरवर अवलंबून राहून दिवस काढू पाहतात . त्यामुळे त्यांच्या ठिकाणी ऐतखाऊपणा वाढत जातो . तर काही जण सरकारकडून मिळणारी मदत किंवा तगाई त्या त्या कामाकरिता न वापरता तो पैसा बसून खातात किंवा उधळपट्टी करून खर्च करतात . व्यसनापायी प्रकृती आणि पैशाची नासाडी होते . व्यसनाधीनतेमुळे नुकसान होणार आहे ही बाब खेड्यात राहणाऱ्या लोकांच्या लक्षात आणून दिली पाहिजे . एक गिलास का नखेड्यात राहणाऱ्या अशिक्षित लोकांना शिक्षणाचं महत्त्व अजूनही पूर्णतया पटलेलं नाही . आपल्या उन्नतीसाठी व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे , शिक्षणाने जीवनात विकास होतो या गोष्टी त्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी तरुणांनी , सुशिक्षितांनी खेड्यात जाणं भाग आहे . प्रौढ शिक्षण वर्ग , छोटी - मोठी वाचनालये अशासारख्या आवश्यक सोयी खेड्यात व्हायला पाहिजेत . खेड्याचा विकास हा खऱ्या अर्थानं भारताचा विकास आहे म्हणून तरुणांनी , सुशिक्षितांनी खेड्याकडे वळणं आवश्यकच आहे .  

मुलांनो तुम्हाला हा 'वैचारिक लेखनाचे प्रकार चला खेड्याकडे' कसा वाटला ? चांगला वाटला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा आणि कमेंट करा.

नमस्कार !

Post a Comment

0 Comments